Saturday, March 13, 2021

मातृत्व

मोबाईलचा आवाज ऐकून मीनाला जाग आली. दुपारच्या वेळी कोणी फोन केला असेल याचा विचार करत ती सावकाश उठून बसली. सात वर्षाचा गौरव जवळच खेळत होता. न सांगताच त्याने मोबाईल आईला आणून दिला.

“ हॅलो, “ मीना सावकाश बोलली.

“ हॅलो मीना! कशी तब्येत आहे ?

“ आता बरी आहे.”

“ मि.राजेश कसे आहेत ?

“ आता तेही ठीक आहेत. अपघातातून वाचले हेच आमचे नशीब म्हणायचे ! पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.”

“ अच्छा ! मीना, मला कसं सांगू कळत नाही. पण सांगणं आवश्यक आहे. काल अमेरिकेतून फोन आला होता. मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ काय ?” मीना किंचाळली. राजेशला जाग आली. तो पडल्या पडल्या संभाषण ऐकू लागला.

“ मीना कुल डाऊन. सांभाळ स्वत:ला. “

“ कायं.. कायं झालं त्यांना अचानक ?”

“ अग मिसेस सॅम्युअलना कोरोना झाला होता. त्या पंधरा दिवसापूर्वी गेल्या. मिस्टर सॅम्युअलना काल हार्ट अँर्टॅक आला. त्यांच्या वकीलाचा फोन आला होता. त्यांनी या महिन्याचे पैसे पाठविले आहेत. पुढच्या महिन्यापासून पैसे पाठवू शकणार नाही, असे कळवले आहे आणि मीना, आता बाळाची जबाबदारी कोणी घेणार नाही तेव्हा बहुतेक तुम्हांला ....”

मीनाला काही सुचेना. ती थरथरायला लागली. तिने फोन कट केला. सुन्न होऊन खुर्चीत बसली. राजेश कॉटवर उठून बसला. आपल्या आईला नेमकं काय झालं आहे गौरवला कळेना. तो भांबावल्या नजरेने आईकडे पहायला लागला.

राजेशने गौरवला सांगितले, “ गौरव, आईला जरा पाणी आणून दे.” गौरवने मीनाला पाणी दिले. पाणी प्यायल्यावर तिला जरा बरे वाटले. ती गौरवला म्हणाली, “ गौरव, थोडावेळ प्रतिकबरोबर खेळायला जातोस का ? तू सकाळी जायचं म्हणत होतासं ना!”


२.

“ माझ्याकडची सापशिडी घेऊन जाऊ का आई? ,“ गौरव म्हणाला.

“ बरं ! ” कसंनुसं हसत मीना म्हणाली. गौरव बाहेर गेला. राजेशने शांतपणे विचारले, “ फोन कोणाचा होता ? नेमकं काय झालं ? ”

मीनाने आवंढा गिळला व म्हणाली, “ अँडव्होकेट कदमबाईंचा फोन होता.”

मीनाला घाम फुटत होता. तिची ती तणावपूर्ण अवस्था राजेशला कळेना. तो म्हणाला, “ तू एवढी का घाबरली आहेस? असं काय सांगितलं त्यांनी?”

मीना दबक्या आवाजात म्हणाली, “ मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ असं कसं होईल? ते पंधरा दिवसापूर्वी बोलले ना तुझ्याशी ?”

“ हो! ते बोलले. त्यावेळी ते थोडे थकलेले जाणवत होते. त्याच कालावधीत मिसेस सॅम्युअल कोरोनाने गेल्या. काल मिस्टर सॅम्युअल हॉर्ट अँटॅकने गेले. या महिन्यात फक्त पैसे मिळणार असं त्यांचा वकील म्हणाला आणि ... “ मीना बोलायची थांबली.

“ अगं आणि काय ? तुझ्या पोटातल्या बाळाचं काय ?” राजेश रागाने बोलला.

“ आता बाळाला कोण स्वीकारणार? ज्याना हवं होत ते तर गेले.”

राजेश आवेशाने म्हणाला,” मीना, अग हे आपलं बाळ नाही. त्यात तुझा-माझा अंश नाही. तू फक्त सरोगेट मदर आहेस.”

मीना भरल्या डोळ्यांनी म्हणाली, “ पण ज्यांचा तो अंश आहे ते आता या जगात नाहीत. “

राजेश तुसड्यासारखा म्हणाला, “ मग त्यालाही या जगात राहायचा अधिकार नाही. जन्माला येण्याआधीच आईबापाला खाणारं हे मूल मीना या घरात नको. “

राजेशच्या या बोलण्याने मीना हादरून गेली. ती काय बोलणार होती. पाच महिन्यापूर्वी राजेशचा अपघात झाला. मित्राच्या बाईकवरून येताना एका ट्रकने त्यांना उडवले. मित्र त्याच वेळी गेला. राजेश मात्र गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. दोन्ही पायाची हाडं मोडली होती. हॉस्पिटलचा लाखो रूपयांचा खर्च कसा करायचा हा त्या वेळी मीनासमोर यक्ष प्रश्न होता. नातेवाईकांनी हात वर केले. अपघाताच्या केस संदर्भात तिची अँडव्होकेट कदमबाईंशी ओळख झाली. मीनाच्या आर्थिक परिस्थितीवर तिने सरोगेट मदर बनण्याचा सल्ला दिला. ज्यांना मूल होत नाही त्यांना आपलं गर्भाशय भाड्याने द्यायचं. सुरूवातीला मीनाने या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. पण एका ऑपरेशनलाच तिचे दागिने, साठवलेले पैसे संपले.



३.

घरखर्च चालवणंही तिला अवघड होतं. अजून राजेशचे दोन ऑपरेशन बाकी होते. तो आपल्या पायावर उभा राहिल की नाही हेही माहित नव्हते. शिक्षण कमी असल्याने मीनाला चांगली नोकरी मिळणं अवघड होतं. वेगवेगळ्या संस्थाकडून मदत मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. पण म्हणावे तसे यश मिळाले नाही. शेवटी धीर एकवटून तिने राजेशला सरोगेट मदर होऊ का विचारले. त्याच्याकडेही दुसरा पर्याय नसल्याने त्याने मंजुरी दिली.

मिस्टर व मिसेस सॅम्युअल दोन दिवसात अमेरिकेहुन आले. कायदेशीरबाबी पूर्ण करून झाल्यावर आठ दिवसात मीनाच्या गर्भाशयात बीजारोपण करण्यात आले. नऊ महिने घरखर्च व बाळाच्या जन्मानंतर पाच लाख रूपये दिले जाणार होते. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि आता अचानक ही बातमी...

मीनाने डोळे पुसले. राजेश म्हणाला, “ हे बघ मीना, जास्त विचार करू नकोस. उद्याच डॉक्टरकडे जा आणि पाडून टाक तो गर्भ. तो आपला नाही आणि खर्चही आपल्याला परवडणारा नाही.”

मीनाने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्यात गौरव आला. आईकडे खाऊ मागायला लागला. मीनाने त्याला डब्यातला चिवडा दिला व ती संध्याकाळच्या स्वंयपाकाला लागली. खाता खाता गौरव मीनाकडे आला व म्हणाला, “ आई आपलं बाळ कधी बाहेर येईल? राजू आपल्या ताईबरोबर खेळतो. सोनू आपल्या दादाबरोबर खेळते. मलाही माझ्या भावाबरोबर खेळायचे आहे. लवकर येईल ना बाळ आई?”

मीनाने आपल्या पोटावर हात ठेवला व म्हणाली, “ अजून पाच महिनेतरी लागतील ; पण तुला त्याच्याबरोबर खेळायला दोन-तीन वर्षे थांबावे लागेल ,” असं म्हणत तिने गौरवचा गालगुच्चा घेतला.

“ ठीक आहे. ते येईल त्या वेळी मी खेळेन, “असं हसून गौरव म्हणाला व उड्या मारायला लागला. त्याचे निरागस विचार मीनाला सुखावून गेले. रात्रभर मीना आपल्या पोटावरून हात फिरवत राहिली. तिला त्या अर्भकाविषयी अचानक प्रेम वाटायला लागले. इतके दिवस ती परक्याचे मूल म्हणूनच विचार करत होती. पण आज त्या निराधार अर्भकाची सरोगेट का असेना आपण ‘ आई ‘ आहोत , याची तिला नव्याने जाणीव होत होती. तिच्यातली आई जागी व्हायला लागली. तिला निराधारांचं मातृत्व स्वीकारणा-या सिंधुताई सपकाळ आठवल्या. सिंधूताईंनी कोण-कुठल्या रस्त्यावरच्या मुलांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतले होते. मग ज्या अर्भकाने आपला संसार पडत्या काळात सांभाळला, त्याला या जगात न आणणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल असे मीनाला वाटायला लागले.



४.

सकाळी मीनाने आपला निर्धार पक्का केला. तिने राजेशला जागे केले व म्हणाली, “ माझा संसार सावरणा-या या बाळाला मी जन्म देणार आणि वाढवणारही. यासाठी मला जे कष्ट करावे लागतील ते एक ‘ आई ‘ म्हणून मी आनंदाने करेन. आता या निर्णयात काही झाले तरी बदल होणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ” उत्तराची वाट न बघता मीना नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. चालताना नकळत तिचा हात पोटावरून फिरत होता.



मंगल कातकर

एैरोली, नवी मुंबई.

whatsapp no. 9757088884

Email: mukatkar@gmail.com

Monday, March 8, 2021

अस्तित्वाची लढाई

अस्तित्वाची लढाई”



वर्ष २०१८ हे वर्ष एक नविन ऊर्जा , चेतना घेऊन आलेले आहे, कारण ही तसेच आहे लग्नाला २५ वर्ष पूर्ण होत आहे..सकाळच्या वातावरणात चालता चालता चर्चेला सूरवात झाली. नवरा आणि मी या विषयावर बोलत बोलत घरी पोहचलो. चहां पीतापीता आयूष्यातील पंचवीस वर्षाचे आँड़िट सुरु झाले.कसे गेलेत पंचविस वर्ष ???? या दरम्यान आम्ही कधीही मागे बघितले नाही .सर्व सामान्य माणसांप्रमाने जगणारी फॅमिली मात्र आधीपासूनच वेगळ्या विचारसरणीची असल्याने पंचविस वर्षात मात्र प्रश्न हे प्रश्न नसुन ते एक चालेंज बनले होते. सर्वात महत्वाचे प्रश्नला आम्ही कधीही “समस्या “हा दर्ज़ा दिला नाही.म्हणतात ना सच्चाईने,स्वाभिमानने, धीटाईने जगन्याचा प्रयत्न केला तर समाज, नातेवाईक , शेजार व इतरजन तुम्हाला वेगळे समजतात . मुलांना सांगीतलेली गोष्ट आठवली , In a row there were many white eggs and one golden egg .The golden egg says ,”they laugh at me because I m different, I laugh at them because they all are same”.

आपण जसे pursue करतो हे महत्वाचे असते. नवर्याचा व्यवसाय असल्याने चूल- मूल हे सांभाळून मी इतर चालेंजेस स्वीकारू लागले . रोज़ नविन नविन शिकने हे जनू रक्तातच होते. ‘गुणवंत आणि नामवंत ‘ यातिल फरक समजू लागला.तूमच्यात गुण असेल तर नामवंत होण्यास वेळ लागत नाही . आयुष्य हे प्रत्येक पायरीवर वेगवेगळे प्रश्न टेस्ट करत असते. त्यात पास झालो तर नेक्स्ट रोऊंड ....


ही नसंपणारी परीक्षा असते.या जड़णघडणात यशाला कूठलाही शाँटकट नसतो, कठोर परिश्रमला कूठलाही पर्याय नसतो. म्हहत्वाकांशी होण्याचे स्वप्न मात्र झोपू देत नाही,त्यात clean n clear मतांची भावना आयुष्यातील व्यवहाराला वेगळी दिशा देत असते. व्यवसायातील चढउतार चालूच होते त्यावर तीन तासाचा picture ही कमी पडेल, पण नविन नविन मेसेज सतत मिळत होते. शिवाजीमहाराज म्हणतात ना परीस्थीतीला दोष न देता जे पुढ़े जातात तेच पराक्रमी असतात.कुणाचीही मदत न घेता आपण जी गोष्ट , जो व्यवहांर ,जे आयूष जगतो त्याला एक वेगळे स्वरुप प्राप्त होते . आयूष्य एक drive असते .....कूठे स्पीड वाढ़वायचे कूठे ब्रेक लावायचे हे शिकवत असते त्याचा अनुभव आपण घेत असतो.एकमेकांना समजणे, साथ देणे , दु:ख काळात जवळ रहाणे कधीही कूणाशी तूलना न करणे.... बघा मग कीती मज़ा येते.


प्रत्येक व्यक़्ती ही special आहे , त्यात स्री ही एक वरदानच ठरली आहे.एका चांगल्या मैत्रिनीमूळे मी माझ्या जीवनातील वेगळ्या प्रयोगाला सुरुवात केली ते म्हणजे सामाजिक कार्य ! मनात आवड असेल तर सवड आपोआपच होत असते . आपले व्याप, प्रश्न , चिंन्ता , आर्थिक परिस्थिति आणि बरेच काही ...... आपल आयुष्य हे ज़ेव्हा दूसर्याचे जगने बघत नाही तो पर्यन्त तुमची किमंत कळत नाही. गेली सोळा वर्ष मी छोठ-मोठ social काम नित्य नियमाने करत आहे आणि करत राहणार आहे.आश्रमात जाणे , खेडयातिल मुलांचे प्रोब्लेम, वसतिगृहातिल मूला-मूलिंच्या समस्या , special child हया वर काम करु लागले... हे करत असतांना माझ्या भावनांवर परिणाम होऊ लागला.आपले ज्ञान कमी पडते असे जानू लागले मग रीतसर मानसशास्र शिकण्यासाठी कॉलेज मधे प्रवेश घेतला . चमत्कार!


माझ्या जगण्याची व्याख्याच बदलली .याचा फायदा व्यवसायात पण होऊ लागला.social work करतांना Empathy n sympathy

ला फरक समजू लागला की तूम्हीच तूमचे बेस्ट counselor बनतात .

ओशो चे बेस्ट कोट आहे ते माझ्या मनाला खूप भावते .....”I m responsible for what I spoke, but not for what you understood.”worry is total waste of time . It doesn't change anything but ....surely keeps us very very busy doing nothing.

एक मूलगा आणि मूलगी असल्याने त्यांचे करीअर निवडण्याचे अधिकार त्यांनाच दिले .मूलगा अमेरीकेत आहे व मूलगी अकरावीत आहे.जीवनाकड़े बघण्याचा दृष्टिकोण कीती अंशाचा ठेवावा हे फ़ार महत्वाचे!

वयाच्या पन्नाशीत ही तोच उत्साह , तीच ऊर्जा कायम आहे ,आतपर्यंत एकही औषधाला बळी पड्ले नाही . रोज़ एका स्मीत हसण्याने सुरुवात करते, नित्य व्यायम , छान रहाणीमान ठेवण्यास प्राधान्य , स्वच्छ परिसर करण्यास हातभार .


पंतप्रधांनाना भेटुन आल्यापासून तर असलेला ऊत्साह द्विगणित झालाय .

पुण्यातील बरेच आश्रम online करायचे प्रयोजन आहे त्याने अन्नधान्य वाया जाणार नाही व गरजही भागेल.जगण्याच्या वेगवेगळ्या पध्दतीने सुखी आणि समाधानि यातिल फरक नक्किच प्रकार्शनाने जानवला.

सुविधानाने सुखी रहाण्यापेक्षा आहे त्या परीस्थीती समाधानी रहाणे हेच योग्य !



सौ.सरिता चितोडकर

कोथरुड

पुणे

8308822931