Saturday, July 24, 2021

एकत्र कुटुंब

*एकत्र कुटुंब*

मित्र हो, 
आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या भागात म्हणा, आपण प्रतेक जण ह्या परिस्थितीतून गेलोय,मग भले तो काळ 1990 वर्षापूर्वीचा असो किंवा आताचा असो, ह्याचा सगळ्यांना अनुभव आलेला आहे,
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये घरात एक आज्जी असायची,तिच्या जवळ पेटीची चावी असायची, त्यात मग घरात लागणारे साहित्य ठेवलेले असायचे, पूर्वी साखर शेर्षाची साखर म्हणून पोती च्या पोती मिळायची, जेवढे घरात शेयर तेवढी साखर, पाच रुपये किलो प्रमाणे भेटत असे, लहान लहान मूल येता जाता साखर खात असत म्हणून पेटीत ठेवत असत, त्यात मग तेल, साखर,निरमा पावडर, साबण, मसाले, पार्ले जी बिस्कीट असा सगळा बाजार भरलेला असायचा, कधीतरी आपण जाऊन पेटी उघडली की हा सगळा वास मिक्स होत असे, आणि नाकाला झोंबत असे,

घरी पाहुणा आला की घरात असलेली सूनबाई आज्जी कडे चावी घेऊन ये म्हणून पाठवत असे,त्यात त्या आज्जी ची करडी नजर असायची, भांड्यात तेल जास्त पडले की मागून हळूच ठोमना मारून सुनेला समझ देत असे,
काही ठिकाणी दूध जास्त ठेवलेले असायचे ,नसेल तर वाटी घेऊन बाजूच्या शेजारच्या घरात पाठवणे, हा प्रकार जास्त असायचा, 
घरचा जावई अचानकपणे आला असेल तर सासूबाई आजू बाजूला गल्लीत गावठी अंडी हुडकून आणून त्याला जेवण घालत असतं, आता फोन मुळे सहज शक्य आहे,अगोदर कळवतात,त्यामुळे चिकन मटण सोय होतेच,

सकाळी बाहेर जाणारे असतील तर त्यांना डब्बा द्यावा लागे, म्हणून जेवण बनवणारी सून ही पर्मनंट जेवण बनवत असे, बाकीच्या सूनानी मग गोठ्यात , शेतात, अशी कामे असत,
एकटीच्या हातची जेवणाची सवय लागलेली असे, भाकरी करताना फार काळजी घ्यावी लागत असे, कारण 20 ते 25 जण एका कुटुंबात संख्या असायची, त्यांच्या सगळ्यांच्या भाकरी मोजून करताना म्हणजे तिचे बीचारीचे नाके नऊ वाजत असत, किमान दोन भाकरी म्हणजे सकाळी चुलीवर चालू झालेली भट्टी ही अकरा वाजे पर्यंत चालूच असायची, त्यात मग वडील मंडळी, म्हातारी मंडळी, नोकरी करणारे, आणि मग बच्चे कंपनी, म्हणजे त्या सुगरण बाईचे बारा वाजत असत, त्यात काही लोक केलेल्या भाजीला नावे ठेवत, नाक मुरडत भाकरी खात असतं,

त्यात सासूबाई चा जीव वरखाली होत असे,कारण दररोज सकाळ संध्याकाळ भाजी आणि भाकरी करणे म्हणजे पिठाचा डब्बा खाली जात असे, मग त्यात एका पोर्ग्याचे पोरं जास्त असली की एवढी कशा पोरं काढून बसोची म्हणून वरून फुले टाकत असत,

पण विचार करा, तुमच्या समोर चित्र उभा राहिले असेल,गरम गरम भाकरी करताना आपली आई, काकू, बहीण ह्यांचे किती हाल होत होते, आता सगळी कडे गॅस आलेत, एवढं त्रास नाही आणि कुटुंब पण मोठी नाहीत,
हम दो हमारे दो प्रमाणे आता विभक्त पद्धती आल्या,
पण मला एक सांगायचे आहे,
ज्या घरात एकत्र येऊन जेवण एकत्र होत नाही त्या घरात एक्की ही नसतेच आणि त्या घरात लवकर बरकत येत नाही, सकाळी लोक आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात पण संध्याकाळी कुटुंबात सर्व लोकांची पंगत बसली पायजे, दिवसभरातील झालेल्या कामाची यादी, उद्या काय करणार, लहान मुलांनी केलेल्या करामती, ऐकायला भेटते,

आणि मुख्य म्हणजे केलेलं सगळे जेवण आपल्या सर्वांच्या समोर असते त्या मुळे कोणी किती खावं याचा अंदाज येतो, आणि सर्वजण खुश होतात, नाहीतर एकदा एकदा जेवण करणारी ला काहीच मिळत नाही, बिचारी ला जे आहे त्यात समाधान मानून खावं लागत,

त्या वेळी घरचालक जेव्हा बाजार गावी जात असे तर एवढया लोकांना काय घेऊन जाणार, मग चिरमुरे आणि खारा हा सर्वात कॉमन  मेनू, 
घरी आल्या आल्या सगळी लहान मूल आणलेला बाझार आगदी उत्सुकतेने बघत असत, मग चुरमुरे वाटणारा वाटत असे, आणि काही वेळा अंदाज न आल्यामुळे वाटणारा रिकामी राहून जायचा ,त्यात मग जे वाटून खात असत,त्यातले मग त्या वाटणाऱ्या ला देत असत,पण घरात असलेली आज्जी हीच कणा असे,
ती जेव्हा वाढेल तेव्हाच लोकांनी जेवायचं, मग कधी कमी जास्त वाढत असे, मग त्यात काही जण रुसवा फुगवे करणारे काही लोक असतात,
मुख्य म्हणजे मटण किंवा अजून काही पोळी जेवण असेल तर मग वाढणारी चे नाके नऊ होत असतं,

पण ती मज्जा आता नाही, 
सण असोत, इतर काही समारंभ असोत, पण ती मज्जा काही वेगळीच असायची,

त्यात काही चालक असे होते, ऐकून आम्हाला पण माहीत, त्या वेळी गुळाचे घणे होते, तो गूळ बेळगाव रविवार पेठेत जात असे, मग हे घरचालक  ती पट्टी म्हणजे पैसे आणण्या साठी म्हणून सकाळी पहिल्या गाडीने भाकरी बांधून जात असत आणि संध्यकाळी शेवटच्या गाडीने परत येत असत,
पण काही जण असे पण होते की, त्या नेलेल्या भाकरी न खाता मस्त पैकी हॉटेल वर जाऊन आगदी ताव मारून दिवसभर फिरून घरी,
घरी आल्यावर भाकरी का परत आणली म्हणून विचारलं तर खायला वेळ मिळाला नाही हे कारण ऐकायला मिळत असे,हे मग सगळे घानेमालक एकत्र कधीतरी बसलेले असणार, मग हे कुठे जेवले, कुठे पिले, कुटला सिनेमा बघितला हे सगळे बाहेर पडत असे,

काही चालक आपल्या सगळ्या कुटुंबातील व्यक्ती ना वर्षात एक दिवस नवीन कपडे शिवत असत, तो कपडा बेळगाव वरून आणला जात असे, शर्ट आणि चड्डी असे पांढरा आणि खाक्की कापड असे, तरी पण त्यात काही मुलांना वेगळे कापड, आणि काहीना मवुगर कापड असे असायचे, तरी पण कोणी काही बोलत नसे, वचक होती,पण आपल्या घरात ज्या राबणाऱ्या बायका असतात त्यांना कधीच ह्या लोकांनी नवीन साडी घेतली नसायची, गावात एकमेकाचे बघून पण लोक वागत असतं,बिचारी माहेरपन ला गेली तरच तिला नवीन साडी भेटत असे.

त्या वेळी एकटा घरचालक काय म्हणेल ते मग ते चुकीचे का असेना सर्वजण त्यांचा आदर करून काम करत असतं,पण काही लोक आपली मनमानी करून मग भावा भावात भांडण सुरू झाली आणि त्यात एकत्र कुटुंब पद्धती ही नाश पावली, आता सर्रास लोक सुशिक्षित आहेत, तरी पण तिघे चौघे भाऊ असले तरी, लग्न होई पर्यंत लई चांगले पण लग्न झाली की घरचा सत्यानाश होत आला, मग त्यात इर्षा वाढली, भाऊबंदकी वाढली, आणि आपल्या रक्त्याच्या नात्यात विळा कुराडी ची भाषा बोलू लागली,
गावचे काही पंच लोक असत,त्यांनी जे म्हणतील ते मुकाट्याने ऐकून घ्यावं लागतं असे, कोण आडवा बोलला तर त्याला व्हणा मारत असत, कारण ही पंच मंडळी बुजुर्ग असे, आणि रात्र रात्र भर काही कुटुंबात कलह असे तो कधीच संपत नसे, 
तरी पण हे लोक कधी चहा ची अपेक्षा न करता आपला फैसला सूनाऊन जात असत, मग ती भांडी असोत, घर असो, जमीन असो,जनावरें, ह्या सगळ्याची वाटणी होत असे,
आता पद्धत बदलली आहे, एकत्र जमीन कुठ असेल तिकडे एकटा, दुसरीकडे दुसरा, म्हणजे भांडण होऊ नये ही भावना आहे,तरी पण कुरघोड्या चालूच असतात,

म्हणून संस्कार महत्वाचे आहेत, लहान मुलांना आपण काय ज्ञान देतोय हे आपल्या पालकांचे लक्ष पायजे, संगत कुणाची आहे आणि त्यांना काय करायचे आहे, कशात जास्त इंटरेस्ट आहे हे स्वतः पालकांनी समजून घेऊन त्यांना पुढे चाल द्यावी,

उगाच मुलावर बळ जबरी करून पुढे शिकायला घालू नये, ज्यांची कुवत आहे त्यांनी जरूर मुलांना चांगल्या ठिकाणी शिकवावे, शेती साठी नवीन नवीन कोर्स आलेत त्यांनी ते शिकावे, नवीन कॉन्ट्रॅक्ट पद्धती आलेत, ज्यांची जमीन भरपूर आहे त्यांनी स्वतः आपल्या शेतात प्रयोग करावेत,
ज्यांची नाही त्यांनी लिज वर घेऊन करावी, करण्याची तयारी असेल तर काहीही करता येते,

जिद्द असेल तर सहज शक्य आहे.
मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन द्या, अध्यात्म म्हणजे काय हे शिकवा, गावोगावी भुरटे गुरू म्हणून हिंडत आहेत, त्यांच्या मागे न लागता गुरू म्हणजे आपले आई वडील हेच गुरू मानून काम केले तर नक्कीच यशस्वी व्हाल,

भुरट्या आणि ढोंगी बाबा न करता, स्वतः राबल्या शिवाय आणि कष्ट केल्या शिवाय जीवनात यश मिळत नाही हे आपल्या मुलांना शिकवा, आणि फक्त नोकरी नोकरी न करता आता पासून बिझनेस कसा करता येईल हे बघणे,
मग भले त्यात चहा गाडा असो, दूध व्यवसाय असो, शेळी पालन असो,
गावरान कोंबडी पालन असो,अंडी बिझनेस असो, काहीही करा पण न लाजता बिझनेस करावा,
लोक काय म्हणतील म्हणून घरी बसू नका ,

शिका ,खूप मोठे व्हा

काळजी घ्या, पाऊस जास्त आहे, बाहेर जाऊ नका, कॉरोना अजून गेला नाही, ह्या वर्षी धबधबा बघायला गेला नाही म्हणून कोण रुसणार नाही, जिभेला जरा लगाम घाला, सगळे काही सुरळीत होणार आहे,
काही चुकल्यास माफी,
सहज आठवले म्हणून पाठवले
सर्वांना सुखी ठेव देवा

धन्यवाद

No comments:

Post a Comment